कारगिलच्या पावित्र्याच्या पुनरस्थापनेसाठी ज्या शूर सैनिकांनी आपले जीवन समर्पीत केले त्या देदीप्यमान शौर्यगाथांनी सदैव आपणांस प्रेरणा देत राहावे याच हेतूने देशभरातल्या ३५,००० महत्वाच्या बातम्यांचे संकलंन करून जवानांनी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची शौर्यगाथा मी या पुस्तकाच्या रुपात जपून ठेवली आहे.
आजपासून रोज एक बातमी प्रकाशीत करत हे पुस्तक मी याठिकाणी भारतीयांसाठी तहहयात नी:शुल्क उपलब्ध करून देत आहे. ब्लॉग रुपी कारगिलचा हा गौरवोध्याय, आपणा सर्वांनाच आता प्रात:स्मरणीय राहील....